

Ashadhi Wari Pilgrimage: Toll Waiver for Devotee Vehicles to Ensure Smooth and Safe Journey
sakal
सातारा : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी, भाविक यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे, तसेच यापूर्वी टोलमाफी नसलेल्या एसटी महामंडळाच्या बसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.