Udayanraje Bhosale : कायदा न केल्यास अधिवेशन संपल्यावर जनता सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही : खासदार उदयनराजे भोसले

Satara News : महापुरषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कडक असा विशेष कायदा झाला पाहिजे. तो अजामीन पात्र असला पाहिजे, या गुन्ह्यांचा तपास उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हवा, गुन्ह्याचे आरोपपत्र सादर करण्याला केवळ ३० दिवसांची मुदत पाहिजे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अन्य नेते ते खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील तर, महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असलेल्या कायदा विधानसभेच्या चालू अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. हा कायदा न केल्यास अधिवेशन संपल्यावर महाराष्ट्रातील जनता सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com