'शर्यत' बंदीमुळे आठ वर्षात 42 लाख बैलांची कत्तल

Vijay Jadhav
Vijay Jadhavesakal
Updated on

काशीळ (सातारा) : नाशिकमध्ये चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन बैलगाडी शर्यती (Bullock Cart Race) सुरू करण्याची मागणी केली होती. त्या वेळी आपले सरकार आले, की प्रयत्न करू असा शब्द त्यांनी दिला होता. तेव्हा सरकार येईपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, असा निर्धार केला होता. गेल्या चार वर्षांपासून मी अनवाणी फिरत आहे. आता ठाकरेसाहेब तुमची सत्ता येऊन दीड वर्ष झाले, तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत. बैल, गाईना अनुदान द्या व संविधान कलम ४८ प्रमाणे जुंपण्याची जनावरे कोणती ते जाहीर करा, या मागण्यासाठी ठाकरेसाहेब मी मुंबईला येत आहे, मला भेटा आणि दिलेला शब्द पाळा, अशी आर्त हाक साखराळे (जि. सांगली) येथील विजय जाधव यांनी दिली आहे. (Vijay Jadhav Demand To Chief Minister Uddhav Thackeray To Start Bullock Cart Race In Maharashtra bam92)

Summary

घोड्याची शर्यत चालते, मात्र बैलगाडी शर्यती घेतली, की गुन्हे नोंद केले जात आहे. शर्यतीवरील बंदीमुळे गेल्या आठ वर्षांत ४२ लाख बैलाची कत्तल झाली आहे.

इस्लामपूर ते मातोश्री (मुंबई) बैलगाडीतून बैलाची प्रतिकृती घेऊन अनवाणी विजय जाधव व नितीन पाटील यांनी पदयात्रा सुरू केली आहे. या वेळी श्री. जाधव म्हणाले, ‘‘ट्रॅक्टर कंपन्यांसाठी सरकारने बैलाला जंगली प्राणी म्हणून घोषित केले. मग जुंपण्याची जनावरे कोणती ते जाहीर करा. बैल तर जुंपण्याचे जनावरे असेल तर जंगली कसा होतो. बैलाची शारीरिक क्षमता तपासा. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाची क्षमता धावण्याची असेल, तर बैलाच्या मैदानी खेळास परवानगी द्या. घोड्याची शर्यत चालते मात्र बैलगाडी शर्यती घेतली, की गुन्हे नोंद केले जात आहे. शर्यतीवरील बंदीमुळे गेल्या आठ वर्षांत ४२ लाख बैलाची कत्तल झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या बैलगाडीस बैल नसल्यामुळे मी बैलगाडी ओढत आहे.’’ मुख्यमंत्रीसाहेब मी २२ जुलैला देशी बेंदराला मुंबईला येत आहे. मला वेळ देऊन आमच्या मागण्यांबद्दल आश्‍वासन द्या आणि अनवाणी फिरणे माझे बंद करा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

Vijay Jadhav
'जनरेट्यापुढं भले-भले झुकतात; ईडीनं कारवाईचं धाडस बंद करावं'

पोलिस भरती होत नसल्याने दररोज हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. यातून विद्यार्थ्यांच्यात नाराजी येत आहे. सरकारने नुसते आश्‍वासन न देता त्वरित भरती प्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी नेर्ले (जि. सांगली) येथील संदीप पाटील हा तरुण या पदयात्रेत सहभागी झाला आहे. भरतीत होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्याचे होणारे नुकसान सांगण्यासाठी मी जात असल्याचे संदीप याने सांगितले.

Vijay Jadhav Demand To Chief Minister Uddhav Thackeray To Start Bullock Cart Race In Maharashtra bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inspiring Journey of Sanil Nikam from Poverty to Police Sub-Inspector
95% Work Completed on Tapola-Ahir Bridge; 50 Km Detour to End Soon
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Encroachment Menace Grows in Vidyanagari, Residents Demand Immediate Action
Marathi News Esakal
www.esakal.com