
कऱ्हाड - भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे भाजपकडून आरक्षणाची अपेक्षा ठेवू नये. कुणबी समाजाला दाखले देण्यास आमचा विरोध नाही. सर्व कुणबी ओबीसीमध्ये आहेत. मात्र नव्याने ज्या गॅझेटचा आधार घेऊन सर्व मराठा समाज कुणबी होईल असेल बोलले जात आहे.