राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

सातारा : राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे. मनुष्य दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. सांगली येथे जाण्यापुर्वी तावडे हे सातारा शहरात अल्पवेळ थांबले हाेते.

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या चर्चेत तावडे यांनी विविध प्रश्नांवर त्यांचे मत मांडले. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, हा दोष सरकारचा का ?

या प्रश्नावर तावडे म्हणाले, अशा प्रकरणात राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी. संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते राज्य सरकारने केले पाहिजे, असे सामान्य नागरिकांना वाटते. माणूस दोषी का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच.यावेळी सातारा जिल्हा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील,  आदी उपस्थित होते.

व्हा लाभार्थी! ३३ टक्के सवलत देऊनच सुरु झालीय FasTag ची अंमलबजावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com