

After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance
sakal
कऱ्हाड: धैर्यशील कदम यांना किती मते पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले? याचा आम्ही नक्कीच हिशोब करू. हिशोब करण्यात आम्ही पक्के आहोत. या निवडणुकीसंदर्भात अनेकांची गणिते वेगवेगळी होते. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते. मात्र, ते कोणाला शक्य झाले नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती? मात्र, महायुती म्हणून आम्ही एकत्र येतो, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे लगावला.