shambhuraj Desai
कऱ्हाड - राज्यात शिवसेना आणि भाजपची युती म्हणूनच आम्ही नगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या. ज्या ठिकाणी युती झाली नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढत झाली. महापालिकांच्या निवडणुकाही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. शिवसेना-भाजप युतीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री येथे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.