

Yerlawadi Lake in Satara Khatav Reaches Critical Low Level as Villagers Demand Government Action to Save Water Supply
sakal
वडूज : या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खटाव तालुक्यातील शेती पाणी परिस्थिती कमालीची अडचणीत आली आहे. तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीनेही तळ गाठला आहे. त्यामुळे येरळवाडी तलावामध्ये उरमोडी, जिहे- कठापूर योजनेतून तातडीने पाणी सोडण्याची गरज आहे. मायबाप सरकार... येरळवाडीला संजीवनी द्या, असा आर्त टाहो तालुक्यातील जनतेकडून फोडला जात आहे.