
जर भारतावर हवाई हल्ल्याचा धोका निर्माण झाला, तर नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा सज्ज असते – ती म्हणजे एअर रेड सायरन. पण यामागे काम करणारी यंत्रणा केवळ एक सायरनपुरती मर्यादित नसून, ही एक गुंतागुंतीची, मल्टीलेयर म्हणजेच बहुपर्यायी सुरक्षा यंत्रणा असते. चला तर मग जाणून घेऊया, युद्धजन्य परिस्थितीत देशाचा एअर डिफेन्स सिस्टम कसा काम करतो.