

Beyond Measurements: Why the Aravalli Debate Matters for India’s Climate Future
E sakal
Aravalli Under Threat: How Administrative Definitions Are Weakening Environmental Security
लेखक : महेश शिंदे
दिल्ली एनसीआरमध्ये दरवर्षी हिवाळ्यात वाढणारे वायुप्रदूषण, उन्हाळ्यात तीव्र होत जाणारी उष्णता आणि सतत खाली जात असलेली भूजल पातळी हे आजचे प्रश्न अचानक निर्माण झालेले नाहीत. हे दीर्घकाळ चाललेल्या पर्यावरणीय दुर्लक्षाचे परिणाम आहेत.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलेली अरावली पर्वतरांग आपल्याला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारते,विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाच्या मूलभूत संरक्षणात किती तडजोड करू शकतो?
सध्या सुरू असलेला अरावली वाद हा केवळ खाणकाम किंवा भौगोलिक व्याख्येचा प्रश्न नसून, भारताच्या पर्यावरणीय शासनातील दृष्टीकोन, प्राधान्ये आणि मर्यादा उघड करणारा मुद्दा आहे. एका प्राचीन पर्वतरांगेचे भवितव्य आज कागदावरील शब्द, मोजमाप आणि प्रशासकीय सोयींवर अवलंबून राहिले आहे, ही बाबच चिंताजनक आहे.