Dayanand Sarswati
Esakal
लेखक : विपुल वाघमोडे
भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या इतिहासात दयानंद सरस्वती हे एक प्रभावी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात संघर्ष, तसेच समाजातील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. 'वेदांकडे चला' हा त्यांचा घोष भारतीय समाजाच्या आध्यात्मिक आणि वैचारिक पुनर्बांधणीचा पाया ठरला. त्यांच्या विचारांनी पुढे राष्ट्रीय चळवळीवरही अप्रत्यक्ष परिणाम घडवून आणला.