
Philosophy of thought
esakal
प्रस्तावना
आपण सर्वजण विचार करतो, पण खरा विचार कधी सुरू होतो? एफ. स्कॉट फिट्झेराल्ड या लेखकाने म्हटले आहे की खरी बुद्धिमत्ता म्हणजे एकाच वेळी दोन परस्परविरोधी कल्पना मनात धरूनही नीट काम करता येणे. याचा अर्थ असा की, विचार हा नेहमी सोपा किंवा एकाच दिशेने चालणारा नसतो.
त्यात विरोध, प्रश्न आणि मतभेद यांची आवश्यकता असते “विचार करणे हे खेळासारखे असते; विरोधी गट नसल्यास त्याचा प्रारंभ होत नाही” या वाक्यात खूप मोठा संदेश दडलेला आहे. जसा खेळ प्रतिस्पर्ध्याशिवाय सुरू होत नाही, तसाच विचारही आव्हानाविना सुरू होत नाही. कोणी विरोध केला नाही तर आपला विचार अपूर्ण आणि उथळ राहतो. विरोध झाला, मतभेद निर्माण झाले की विचार अधिक खोलवर जातो, तो परिपक्व होतो.