Premium|Study Room : एआय-फर्स्ट गव्हर्नन्सकडे भारताची वाटचाल; सरकारी सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नेमके काय बदलणार?

AI First Governance : डिजिटायझेशननंतर भारत आता एआय-फर्स्ट गव्हर्नन्सकडे वाटचाल करत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सरकारी सेवा अधिक जलद, अचूक, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यावर भर दिला जात आहे.
AI First Governance

AI First Governance

Updated on

लेखक - श्रीकांत जाधव

गेल्या काही दशकांत भारताने डिजिटल क्षेत्रात घेतलेली झेप संपूर्ण जगासाठी एक अभ्यासाचा विषय ठरली आहे. आधार, युपीआय आणि डिजिलॉकर यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे भारताने प्रशासनात मोठी पारदर्शकता आणली. मात्र, आता आपण 'डिजिटायझेशन'कडून एका पाऊल पुढे जात 'एआय-फर्स्ट गव्हर्नन्स' च्या दिशेने वाटचाल करत आहोत.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आता केवळ तंत्रज्ञान कंपन्यांच्या वातानुकूलित कार्यालयांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता थेट ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. सरकारी सेवा नागरिकांपर्यंत अधिक वेगाने, अचूकतेने आणि त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत पोहोचवण्यासाठी 'एआय'चा वापर कसा होतोय आणि यामुळे प्रशासकीय रचनेत नेमके कोणते बदल घडत आहेत, याचे सविस्तर विश्लेषण करूया.

१. एआय-फर्स्ट गव्हर्नन्स' म्हणजे नेमके काय?

आतापर्यंतचे सरकारी तंत्रज्ञान हे प्रामुख्याने माहिती साठवणे आणि प्रक्रिया करणे (Data Processing) यावर भर देत होते. पण 'एआय-फर्स्ट' दृष्टिकोनाचा अर्थ आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील संकटांचा आधीच वेध घेणे आणि नागरिकांना त्यांच्या गरजांनुसार सेवा देणे. जेव्हा एखादा नागरिक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतो, तेव्हा कागदपत्रांची छाननी करण्यासाठी महिनोन् महिने लागण्याऐवजी, एआय प्रणाली काही सेकंदात पात्रता तपासून लाभार्थ्याला मंजुरी देऊ शकते. म्हणजेच, जिथे पारंपरिक डिजिटल तंत्रज्ञानाने 'गती' दिली, तिथे एआय आता निर्णयक्षमता देत आहे. 'इंडिया एआय मिशन २०२६' अंतर्गत भारत सरकारने ३४,००० पेक्षा जास्त GPU ची क्षमता निर्माण केली असून, स्वतःचे 'फाउंडेशन मॉडेल्स' विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

२. भाषिक अडसर दूर करणारी 'भाषिणी'

भारतासारख्या बहुभाषिक देशात सरकारी सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठा अडथळा असतो तो भाषेचा. इंग्रजी न येणाऱ्या नागरिकांना अनेकदा सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 'भाषिणी' (BHASHINI - Bhasha Interface for India) हे एआय आधारित राष्ट्रीय भाषांतर मिशन सुरू केले आहे.

आवाजावर आधारित तंत्रज्ञान (Voice-First System): भाषिणीमध्ये २२ हून अधिक भारतीय भाषांचे मॉडेल तयार करण्यात आले आहेत. एखादा निरक्षर नागरिक त्याच्या बोलीभाषेत प्रश्न विचारून सरकारी योजनांची माहिती घेऊ शकतो.

केस स्टडी - सभासार : ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामसभेच्या बैठकांचे अचूक इतिवृत्त (Minutes) ठेवणे हे नेहमीच जिकिरीचे काम असते. 'सभासार' हे एआय टूल ग्रामसभेतील ऑडिओ किंवा व्हिडिओचे विश्लेषण करून थेट १४ भारतीय भाषांमध्ये बैठकीचे मुद्देसूद आणि अचूक इतिवृत्त तयार करते. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामात मोठा पारदर्शीपणा आला आहे.

सुनो सूत्र : हे भारताचे पहिले 'हँडहेल्ड एज एआय' उपकरण आहे, जे इंटरनेट नसतानाही रिअल-टाइम भाषांतर करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com