Study Room
Premium|Study Room : २०३० मध्ये कॉमनवेल्थचे यजमानपद भारताकडे; भारताची जागतिक क्रीडा क्षमता काय.?
2030 Commonwealth Games India : २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळणे ही भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षमता, व्यवस्थापन कौशल्य आणि आर्थिक-राजकीय प्रभाव सिद्ध करण्याची ऐतिहासिक संधी आहे, जी अहमदाबादमध्ये शून्य-भ्रष्टाचार आणि पर्यावरणपूरक अंमलबजावणीच्या आव्हानांसह साकारणार आहे.
गौरव बाळे
प्रस्तावना
भारताला २०३० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळणे हा देशाच्या क्रीडा, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रातील वाढत्या प्रभावाचा द्योतक आहे. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या गेम्सनंतर २० वर्षांनी पुन्हा एकदा भारताला ही संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, २०३० मध्ये या स्पर्धांचे शताब्दी वर्ष साजरे होणार आहे आणि या ऐतिहासिक पर्वाचे आयोजन भारतात होणे ही एक मोठी संधी मानली जाते. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षमता, व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिक पायाभूत सुविधा ठळकपणे समोर येतील.

