Premium|Study Room : भारतातील वाढत्या वृद्धत्वाचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम!   

Elderly Care and Social Security in India : भारत हळूहळू 'वृद्धत्वाकडे झुकणारा समाज' बनत असून २०५० पर्यंत वृद्धांची संख्या ३४ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. आर्थिक असुरक्षितता, आरोग्य समस्या आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव ही भविष्यातील धोरणांपुढील मोठी आव्हाने ठरत आहेत.
Elderly Care and Social Security in India

Elderly Care and Social Security in India

esakal

Updated on

सत्यजित हिंगे

भारत सध्या लोकसंख्यात्मक संक्रमणाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशात सुमारे १०.४ कोटी (८.६%) नागरिक ६० वर्षांवरील होते; ही संख्या २०२३ पर्यंत जवळपास ९.७% वर पोहोचली आहे. वाढत्या आयुर्मानामुळे आणि घटत्या प्रजनन दरामुळे भारत हळूहळू 'वृद्धत्वाकडे झुकणारा समाज' बनत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या २०.८% (सुमारे ३४.७ कोटी) पर्यंत जाईल. ही वाढ केवळ लोकसंख्यात्मक बदल नसून सामाजिक-आर्थिक व्यवस्थेवर खोल परिणाम करणारी आहे.

आर्थिक दृष्टीने पाहता, सुमारे ४०% वृद्ध नागरिक गरीब घटकात मोडतात, तर १८.७% वृद्धांना कोणतेही स्थिर उत्पन्न नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षितता ही एक गंभीर समस्या बनली आहे. ग्रामीण भागात ही स्थिती अधिक गंभीर असून सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com