Premium|Study Room : भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय संबंध; व्यापार, सुरक्षा आणि सामरिक सहकार्याचा नवा अध्याय

India Indonesia Relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यामुळे भारत-इंडोनेशिया संबंधांना नवी गती मिळाली असून, सांस्कृतिक वारसा, आर्थिक सहकार्य आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामरिक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे.
India Indonesia Relations

India Indonesia Relations

esakal

Updated on

दक्षिण आणि आग्नेय आशियाई क्षेत्रात भूराजकीय समतोल, आर्थिक एकात्मता आणि प्रादेशिक सहकार्याला बळकटी देण्यासाठी भारत द्विपक्षीय पातळीवर सातत्याने धोरणात्मक प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्नेय आशियातील अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या इंडोनेशियाला दिलेला अधिकृत दौरा राजनैतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पार पडलेला हा ३ दिवसीय दौरा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक, आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांना नवीन दिशा देणारा ठरला आहे. हा दौरा संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरला असून, यामुळे भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' परराष्ट्र धोरणाला अधिक गती मिळाली आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचे पुनरुज्जीवन

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांना हजारो वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या विशेष निमंत्रणावरून पंतप्रधानांनी हा दौरा केला. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी इंडोनेशियातील प्रसिद्ध 'प्रंबनन' मंदिर समूहाची पाहणी केली, जो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. दोन्ही नेत्यांनी या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामाचा संयुक्त शुभारंभ केला. तसेच, महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी १९२७ मध्ये केलेल्या ऐतिहासिक इंडोनेशियाभेटीच्या शताब्दीनिमित्त पुढील वर्ष म्हणजे २०२७ हे दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरीचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

आर्थिक संबंधांना नवी गती

आर्थिक आघाडीवर इंडोनेशिया हा आग्नेय आशियाई क्षेत्रात भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला असून, दोन्ही देशांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार सुमारे २८ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. भारत हा इंडोनेशियाकडून कच्च्या पाम तेलाचा सर्वात मोठा आयातदार असून, कोळसा आणि इतर खनिजांचीही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. तर भारताकडून इंडोनेशियाला शुद्ध पेट्रोलियम उत्पादने, व्यावसायिक वाहने, पोलाद आणि कृषी मालाची निर्यात केली जाते. या आर्थिक संबंधांना अधिक सुलभ करण्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक (भारतीय रिझर्व्ह बँक) आणि बँक इंडोनेशिया यांच्यात स्थानिक चलनामध्ये (रुपया आणि रुपिया) थेट व्यवहार करण्याबाबत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीचा खर्च सुमारे १०% ने कमी होऊन स्थानिक उद्योजकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com