Premium|Study Room : १९०५ चा तो काळा निर्णय; प्रशासनाचे निमित्त पण राजकारणाचा डाव, असा झाला बंगालचा दोन भागात भाग

Partition of Bengal 1905 : लॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये प्रशासकीय सोयीचे कारण देत बंगालची फाळणी केली, मात्र या निर्णयामागे हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा छुपा राजकीय हेतू होता. या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण भारतात प्रखर राष्ट्रवादाची लाट उसळली आणि स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली.
Partition of Bengal 1905

Partition of Bengal 1905

esakal

Updated on

१९०५ मधील बंगाल विभाजन हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा बिंदू ठरला. लॉर्ड कर्झन (Lord Curzon) यांनी केलेल्या या निर्णयामुळे केवळ बंगालच नव्हे, तर संपूर्ण भारतात राष्ट्रवादाची नवीन लाट उसळली. हा निर्णय प्रशासनाच्या नावाखाली घेतला गेला असला, तरी त्यामागे ब्रिटिशांचे राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येतात.

पार्श्वभूमी : बंगालचे महत्त्व

अ) प्रांताचे स्वरूप : ब्रिटिश भारतातील बंगाल हा सर्वात मोठा आणि प्रभावी प्रांत होता. यामध्ये बंगाल, बिहार, ओडिशा आणि आसाम यांचा समावेश होता आणि लोकसंख्या सुमारे ७८ दशलक्ष होती.
ब) केंद्रस्थान : कलकत्ता (कोलकाता) हे त्या काळचे प्रशासकीय आणि सांस्कृतिक केंद्र होते. त्यामुळे बंगालमध्ये राष्ट्रवादी चळवळीची बीजे आधीपासूनच पेरली गेली होती.

विभाजनाची घोषणा आणि रचना

अ) घोषणा : १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झन यांनी बंगालचे दोन भाग केले :

ब) रचना : पूर्व बंगाल व आसाम (ढाका राजधानी) – मुस्लिम बहुसंख्य, पश्चिम बंगाल (कलकत्ता राजधानी) – हिंदू बहुसंख्य

क) अधिकृत कारण : ब्रिटिशांनी यामागे प्रशासन सुलभ करण्याचे कारण दिले, कारण बंगाल खूप मोठा असल्यामुळे प्रभावी शासन कठीण होत असल्याचे सांगितले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com