

Rishikesh river side campaign guidelines.jpg
esakal
गंगेच्या काठावर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची आणि रिव्हर साइड कॅम्पिंग करण्याची पर्यटकांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, मान्सूनच्या काळात नदीकाठी असलेला हा आनंद काही वेळातच धोकादायक ठरू शकतो. डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम काही तासांनी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याच्या स्वरूपात दिसू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या अगदी काठावर जाणे, तंबू उभारणे किंवा सेल्फी-रील्ससाठी पाण्यात उतरणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.