

Shocking Relationship Twist in Kanpur
esakal
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू आणि जावई एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की त्यांना कुटुंबियांच्या भावनांचा कोणताही विचार न करता चक्क कोर्टात जाऊन लग्न केले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर १३ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करून आपल्या लग्नाची घोषणा केली. पण कुटुंबीयांचा दबाव वाढताच हे जोडपे पळून गेले. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे; एखादी आई आपल्याच मुलीचा संसार कसे काय उद्ध्वस्त करू शकते? असा प्रश्न आता लोक सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत