"नांगरे पाटील व मंडळी फडणवीसांना भिऊ नकोस!... तुझ्या पाठीशी आहे!'

माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांचा पोलिसांना फेसबुकवरून सल्ला
"नांगरे पाटील व मंडळी फडणवीसांना भिऊ नकोस!... तुझ्या पाठीशी आहे!'

सोलापूर : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईवरून संताप व्यक्त केला होता. ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड हे पोलिस ठाण्यात पोचले व तेथे त्यांनी पोलिसांवर हातवारे करत व चढ्या आवाजात बोलत होते, या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला अन्‌ हा व्हिडिओ पाहून माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी "नांगरे पाटील (व मंडळी) भिऊ नकोस!... तुझ्या पाठीशी आहे!' या शब्दात एक पोस्ट फेसबुकला टाकली, ही पोस्टही सध्या व्हायरल होत असून, चर्चेचा विषय बनत आहे.

माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात...

"एक व्हिडिओ पाहिला. स्थळ मुंबईतील एक पोलिस स्टेशन. युनिफॉर्ममधील पोलिस अधिकाऱ्याला देवेंद्र फडणवीस चढ्या आवाजात हातवारे करत विचारत होते. "तुम्ही त्यांना धमकी का दिली?' मला सुरवातीला वाटलं पोलिसांनी फडणवीसांना धमकी दिली असावी. पण तसे नव्हते. औषधांचा बेकायदा साठा करणारांना दिली होती. पण ते साठेबाज बोलत अगर विचारत नव्हते. फडणवीस पोलिसांना दमात घेत होते. अधिकारी सभ्यपणे उत्तर देत होते. पण असा सभ्यपणा फक्त या जाकीटधारीपुढेच का?

पु. ल. देशपांडेंची म्हैस ही कथा पुन्हा ऐकली. अपघात झाल्यावर पंचनामा करण्यासाठी आलेला एक बेरक्‍या हवालदार त्यांनी अफलातून उभा केलाय. तिथं ही जाकीट घातलेल्या पुढाऱ्यापासून लुडबूड करणाऱ्या सर्वांचा आवाज बंद करून त्यांची जागा त्यांना कशी दाखवतो हे ऐकून धमाल येते.

"तुमि मंधी मंधी बोलू नका ओ, आमाला आमच्या लायनी परमान जावू द्या!' हा हवालदाराचा डायलॉग वास्तव वाटतो. कथेतील हवालदार साध्या कपड्यातील ऑर्डर्ली असतो. व्हिडिओतील त्या पोलिस स्टेशन मध्ये तर क्‍लास वन आयपीएस अधिकारी होते. ज्याला धमकी दिली त्यानेच आपली तक्रार मांडायला पाहिजे इतरांना लुडबुड करता येत नाही. इतर सामान्य माणूस त्या ठिकाणी असता तर पोलिसांनी आवाज चढवून बडबड बंद करायला सांगितली असती व ऐकले नसते तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला असता. दोन वर्षापूर्वी दिलेली तक्रार नागपूर पोलिसांनी घेतली नव्हती म्हणून पोलीस महासंचालकांना भेटायला आम्ही गेलो होतो. माझ्या सोबत असलेले विकास लवांडे हे कार्यकर्ते बोलू लागले तर "तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावरच गुन्हा दाखल करील' असा दम सुहास वारके या आयपीएस अधिकाऱ्याने दिला होता.

महाराष्ट्र पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारा व मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले असे म्हणणारा हेच ते फडणवीस होय. मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेमलेले विश्वास नांगरे पाटील कुठे होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मुंबई पोलिसात तीसपेक्षा जास्त IPS अधिकारी आहेत. त्यांना फडणवीस यांचा शेरा मान्य आहे का? कनिष्ठ अधिकारी व कॉन्स्टेबल यांचा मान सन्मान, अस्मिता, यांच्याशी तुम्हाला देणे घेणे नाही हे मी पाहिले आहे. पण तुम्हाला तरी आत्मसन्मान आहे की नाही? नसावा! उगवत्या सूर्याला हात जोडत फायद्याच्या नेमणुका, परदेश वारी, सरकारी प्लॉट... यातच तुम्ही अडकलेले दिसता! सामान्य जनता मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या शिपायाला शिव्या शाप देत आपला राग व्यक्त करते.

हा जॅकेटधारी मुंबई पोलिसांना बदनाम करून दमबाजी करीत असताना पोलिस कमिशनर नगराळे, जॉइंट कमिशनर नांगरे पाटील हे दोघेही मराठी अधिकारी आहेत. या जाकीटधारीची मेहेरबानी नाही! मग तुम्ही त्यांना एवढे का घाबरता? त्यांचा कोप झाला तर तुमची चूल पेटणार नाही अशी तुमची अवस्था नाही! महाराष्ट्रातील सात लाख पोलिसांचे तुम्ही नेते आहात! नांगरे पाटील तर गल्ली गल्लीत जावून स्पर्धा परीक्षेसाठी तरुणांना सल्ला देतात व मृगजळ दाखवतात! आयपीएस बनून काय एसी रूममध्ये दडून बसायचे? नांगरे पाटील व मंडळींची आयपीएस असोसिएशन आहे, लॉबी, माफिया टोळ्या आहेत. कोणतेही पक्षाचे सरकार आले तरी ते त्यांचेच असते पण पो. शिपायांना ना असोसिएशन ना लॉबी. मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था.

पोलिस दलात खूप दोष, कमतरता आहे मान्य आहे. पण त्या शिवाय कोणतच सरकार काम करू शकनार नाही. रस्त्यावरचे पोलिस बाजूला करून बघा बरं? समाज उभा राहूच शकणार नाही. दहा हजारापेक्षा जास्त पोलिस कोरोनाग्रस्त झाले. चारशेच्या आसपास यमाने नेले! हा जॅकेटधारी पोलिसांना बदनाम करतो, अधिकाऱ्यांना दम भरतो, औषध दडवून महाराष्ट्रातील लोक तडफडून मरावेत याची वाट बघतो. मग त्याचा दिल्लीतील बाप राष्ट्रपती राजवट लावून याच्या हातात महाराष्ट्र देईल असा त्याचा होरा आहे!

माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात...

"एक व्हिडिओ पाहिला. स्थळ मुंबईतील एक पोलिस स्टेशन. युनिफॉर्ममधील पोलिस अधिकाऱ्याला देवेंद्र फडणवीस चढ्या आवाजात हातवारे करत विचारत होते. "तुम्ही त्यांना धमकी का दिली?' मला सुरवातीला वाटलं पोलिसांनी फडणवीसांना धमकी दिली असावी. पण तसे नव्हते. औषधांचा बेकायदा साठा करणारांना दिली होती. पण ते साठेबाज बोलत अगर विचारत नव्हते. फडणवीस पोलिसांना दमात घेत होते. अधिकारी सभ्यपणे उत्तर देत होते. पण असा सभ्यपणा फक्त या जाकीटधारीपुढेच का?

पु. ल. देशपांडेंची म्हैस ही कथा पुन्हा ऐकली. अपघात झाल्यावर पंचनामा करण्यासाठी आलेला एक बेरक्‍या हवालदार त्यांनी अफलातून उभा केलाय. तिथं ही जाकीट घातलेल्या पुढाऱ्यापासून लुडबूड करणाऱ्या सर्वांचा आवाज बंद करून त्यांची जागा त्यांना कशी दाखवतो हे ऐकून धमाल येते.

"तुमि मंधी मंधी बोलू नका ओ, आमाला आमच्या लायनी परमान जावू द्या!' हा हवालदाराचा डायलॉग वास्तव वाटतो. कथेतील हवालदार साध्या कपड्यातील ऑर्डर्ली असतो. व्हिडिओतील त्या पोलिस स्टेशन मध्ये तर क्‍लास वन आयपीएस अधिकारी होते. ज्याला धमकी दिली त्यानेच आपली तक्रार मांडायला पाहिजे इतरांना लुडबुड करता येत नाही. इतर सामान्य माणूस त्या ठिकाणी असता तर पोलिसांनी आवाज चढवून बडबड बंद करायला सांगितली असती व ऐकले नसते तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला असता. दोन वर्षापूर्वी दिलेली तक्रार नागपूर पोलिसांनी घेतली नव्हती म्हणून पोलीस महासंचालकांना भेटायला आम्ही गेलो होतो. माझ्या सोबत असलेले विकास लवांडे हे कार्यकर्ते बोलू लागले तर "तुम्ही मध्ये बोलू नका, नाहीतर तुमच्यावरच गुन्हा दाखल करील' असा दम सुहास वारके या आयपीएस अधिकाऱ्याने दिला होता.

महाराष्ट्र पोलिसांची अब्रू वेशीवर टांगणारा व मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले असे म्हणणारा हेच ते फडणवीस होय. मुंबईतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेमलेले विश्वास नांगरे पाटील कुठे होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मुंबई पोलिसात तीसपेक्षा जास्त IPS अधिकारी आहेत. त्यांना फडणवीस यांचा शेरा मान्य आहे का? कनिष्ठ अधिकारी व कॉन्स्टेबल यांचा मान सन्मान, अस्मिता, यांच्याशी तुम्हाला देणे घेणे नाही हे मी पाहिले आहे. पण तुम्हाला तरी आत्मसन्मान आहे की नाही? नसावा! उगवत्या सूर्याला हात जोडत फायद्याच्या नेमणुका, परदेश वारी, सरकारी प्लॉट... यातच तुम्ही अडकलेले दिसता! सामान्य जनता मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या शिपायाला शिव्या शाप देत आपला राग व्यक्त करते.

हा जॅकेटधारी मुंबई पोलिसांना बदनाम करून दमबाजी करीत असताना पोलिस कमिशनर नगराळे, जॉइंट कमिशनर नांगरे पाटील हे दोघेही मराठी अधिकारी आहेत. या जाकीटधारीची मेहेरबानी नाही! मग तुम्ही त्यांना एवढे का घाबरता? त्यांचा कोप झाला तर तुमची चूल पेटणार नाही अशी तुमची अवस्था नाही! महाराष्ट्रातील सात लाख पोलिसांचे तुम्ही नेते आहात! नांगरे पाटील तर गल्ली गल्लीत जावून स्पर्धा परीक्षेसाठी तरुणांना सल्ला देतात व मृगजळ दाखवतात! आयपीएस बनून काय एसी रूममध्ये दडून बसायचे? नांगरे पाटील व मंडळींची आयपीएस असोसिएशन आहे, लॉबी, माफिया टोळ्या आहेत. कोणतेही पक्षाचे सरकार आले तरी ते त्यांचेच असते पण पो. शिपायांना ना असोसिएशन ना लॉबी. मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था.

पोलिस दलात खूप दोष, कमतरता आहे मान्य आहे. पण त्या शिवाय कोणतच सरकार काम करू शकनार नाही. रस्त्यावरचे पोलिस बाजूला करून बघा बरं? समाज उभा राहूच शकणार नाही. दहा हजारापेक्षा जास्त पोलिस कोरोनाग्रस्त झाले. चारशेच्या आसपास यमाने नेले! हा जॅकेटधारी पोलिसांना बदनाम करतो, अधिकाऱ्यांना दम भरतो, औषध दडवून महाराष्ट्रातील लोक तडफडून मरावेत याची वाट बघतो. मग त्याचा दिल्लीतील बाप राष्ट्रपती राजवट लावून याच्या हातात महाराष्ट्र देईल असा त्याचा होरा आहे!

इंग्रजांनी आमच्याकडे आयपी (IP) अधिकारी निर्माण केले त्यातून आयपीएस आले, तसे त्यांच्याकडे आयपीएस सारख्या वेगवेगळ्या ऱ्यांक नाहीत. प्रत्येक पोलिस हा कॉन्स्टेबल या दर्जाला भरती केला जातो व त्यातूनच कमिशनर किंवा चीफ कॉन्स्टेबल बनतो.

फडणवीस यांच्या जॅकेटमध्ये काय दडलंय तसेच हे आयपीएस अधिकारी कच का खातात ते पाहण मनोरंजक ठरेल! आजच नव्हेतर यापुढेही रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांचे मनोधैर्य उच्च दर्जाचे असणे महत्त्वाचे आहे. "Treat a man as he is and he will remain as he is. Treat a man as he could be and he will become as should be! पोलिसांना वाईट वागवले तर ते वाईट बनतील. ते जसे असायला पाहिजे तसे वागविले तर चांगले बनतील! पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम त्यांचे वरिष्ठ अधिकारी करू शकतात. म्हणून तूर्तास एवढाच सल्ला की, "विश्वास नांगरे पाटील (व मंडळी) भिवू नकोस! राज्यघटना तुझ्या पाठीशी आहे! - सुरेश खोपडे

(टीप : सुरेश खोपडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काही असंसदीय शब्द वापरले आहेत, जे या बातमीत वगळले आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com