Budget 2021: 'टॅक्स'ची 'कोरोना'वर बाजी तर 'अर्थव्यवस्था' दुसऱया स्थानावर

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman

औरंगाबाद : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल २०२१-२२ या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. पण, काही कारणांनी हा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा वेगळा आणि खास ठरला आहे. ती कारणे eSakal.com च्या वाचकांसाठी...   

इंदिरा गांधीनंतर निर्मला सीतारामण
इंदिरा गांधीनंतर सीतारामण या देशाच्या दुसऱ्या पूर्णवेळ अर्थमंत्री राहिल्या आहेत. कालचा अर्थसंकल्प हा सीतारामण यांचा तिसरा अर्थसंकल्प होता. यापूर्वी मागील दोन अर्थसंकल्प २०१९-२० आणि २०२०-२१ चे सीतारामण यांनीच मांडले आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी घेतला कमी वेळ  
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं यावर्षीचे अर्थसंकल्पीय भाषण १ तास ४८ मिनिटे चाललं. मागील वर्षीच्या तुलनेत हे भाषण तब्बल १ तासांनी कमी होतं. सीतारामण यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्यावेळेस यावर त्यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण केलं होतं. त्यापूर्वी २०१९-२० ला या अर्थसंकल्पीय भाषणासाठी सीतारामण यांनी २ तास १५ मिनिटांचा वेळ घेतला होता.

कोणता शब्द कितीवेळा?
पावणे दोन तासांच्या भाषणात अर्थमंत्री सीतारामण यांनी ठरावीक शब्दांचा पुनरूच्चार वारंवार केला. त्यामध्ये मागील काही महिन्यांपासून देशभरासह जगात थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ या शब्दांचा वापर तब्बल १६ वेळेस केला. तर ‘टॅक्स’ हा सर्वाधिक म्हणजे ४८ वेळा उच्चारलेला शब्द ठरला आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर (२९ वेळा), परिवहन (२८ वेळा), आरोग्य (२५ वेळा) आणि अर्थव्यवस्था हा शब्द २१ वेळा उच्चारला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com