महापालिकेच्या दिव्यांखाली अंधार! आठ वर्षांपासून लावले खांब; दिवे मात्र गायब

nmc  light poll.jpg
nmc light poll.jpg

नाशिक : महापालिकेतर्फे सध्या शहरातील ९० हजार खांबांवर एलईडी दिवे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर स्मार्ट करण्याचे गोंडस नाव प्रकल्पाला दिले असले तरी शहराच्या एका कोपऱ्यात आठ वर्षांपासून उभे केलेल्या खांबांवर अद्याप दिवेच लागले नसल्याची बाब समोर आली आहे. 

खांबांवर अद्याप दिवेच नाही

महापालिका हद्दीतील म्हसरूळ-वरवंडी रोडवर सीतासरोवर ते महावीर पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंत आठ वर्षांपूर्वी वाजतगाजत ९८ पथदीप बसविण्यात आले. ग्रामीण भाग असला तरी वर्दळ असल्याने व या भागात कायम अपघात होत असल्याने पथदीप बसविण्यात आले. परंतु जेव्हापासून पथदीप उभारले गेले तेव्हापासून खांबांवर दिवेच बसविले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. शहरातील ९० हजार खांबांवरील सोडियम काढून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. गेल्या महिन्यात मे. टाटा कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. परंतु म्हसरूळ रस्त्यावरील खांबांवर आठ वर्षांपासून दिवेच नसल्याच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com