...अन् चक्क पाच टन द्राक्षे फेकावी लागणार?...द्राक्ष हंगामापुढे पेच

graps.jpg
graps.jpg

नाशिक : हैदराबादच्या निर्यातदारांनी जर्मनीत पाठवलेल्या द्राक्षात मिलिबग नियंत्रणा साठी फवारलेल्या रासायनिक औषधाचे उर्वरित अंश (रेसिड्यू) सापडला. यामुळे द्राक्षे फेकून देण्यासाठी पैसे पाठवा, असा निरोप जर्मनीतील रेवे सुपर मार्केटमधून आल्याने द्राक्ष हंगामापुढे पेच निर्माण झाला आहे. 

"फेल सॅम्पल' कुणाचे? हा मुद्दा सुटला नाही

ओझरच्या द्राक्षबागायतदार संघात शनिवारी (ता. 22) सायंकाळी शेतकरी- व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेच्या आधारे एका शेतकऱ्याच्या नावावर दुसऱ्या शेतकऱ्याचा माल पाठवल्याचा संशय उपस्थितांमध्ये बळावला आहे. निर्यातीपूर्वी द्राक्षाच्या नमुन्यात रेसिड्यू आढळले नाहीत. जर्मनीत नमुना "फेल' गेला (रेसिड्यू सापडला). मग पुन्हा नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात रेसिड्यू फ्री असल्याचे आढळून आले, अशी माहिती निर्यातदारांतर्फे देण्यात आली. मात्र, उपस्थित उत्पादक निर्यातदारांच्या नजरेतून पहिला आणि नंतरचा रेसिड्यू फ्री नमुना एका शेतकऱ्याचा असेल तर "फेल सॅम्पल' कुणाचे? हा मुद्दा सुटला नाही. त्याचबरोबर, चार पैशांसाठी देशाचे नाव खराब करण्याचे आणि एकूण निर्यातक्षम द्राक्ष शेतीपुढे संशयाचे ढग उभे करण्याचे कारण काय? असे संतप्त प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. 

पाच हजार कंटेनरची निर्यात बाकी 

निसर्गाच्या बदलत्या वेळापत्रकाबरोबर रेंगाळलेल्या आणि अवकाळी पावसाने द्राक्षशेतीच्या समस्यांमध्ये भर घातली. अशा संकटावर टाच रोवून मात करत चांगले उत्पादन घेतले. विशेष म्हणजे, शून्य रेसिड्यूपर्यंत शेतकरी पोचले, असे द्राक्ष बागायत दार संघाचे खजिनदार कैलास भोसले अभिमानाने सांगतात. नेमक्‍या अशा काळात दुबईसाठी खरेदी केलेला माल सुपर मार्केटला पाठविण्यात आल्याच्या चर्चेचा वणवा ऐन द्राक्ष हंगामात पेटला आहे. जर्मनीतील घटनेने युरोपमध्ये भारतीय द्राक्षाकडे संशयाने पाहिले जाण्याच्या भीतीचा गोळा शेतकऱ्यांच्या पोटात उठला आहे. सद्यः स्थितीत पाच हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होणे बाकी आहे. 

पाच टन द्राक्षे फेकावी लागणार 

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार हैदराबादच्या निर्यातदाराची पाच टन द्राक्षे फेकावी लागणा र असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जर्मनीत नेमकी चोरी पकडली गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. 

द्राक्ष उत्पादकांनी काळजी घेऊन आणि रोखीने व्यवहार करावा. कमी साखर अथवा रेसिड्यूयुक्त द्राक्षे कुणी निर्यात करत असल्याचे लक्षात येताच कृषी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी अशा अपप्रवृत्तीविरुद्ध कारवाई करायला लावावे. - विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com