
नाशिक : (वीरगाव) सध्या कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातले असून, या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहावा यासाठी राज्यातील शहरीसह ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत राज्य शासनाकडून सुटी जाहीर केली आहे. यामुळे शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातही कोरोनाची वाढली भीती
"स्कूल चले हम' म्हणण्याऐवजी "गाव चले हम' असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी आहेत. या विद्यार्थ्यांना सुट्या लागल्यामुळे घरी जाण्याचे आदेश शाळा प्रशासनाकडून मिळाले आहेत. विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे ग्रामीण भागात येत असल्यामुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाची भीती वाढली आहे. शहरी भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठलीही चाचणी न करता त्यांचे ग्रामीण भागात प्रयाण होत असल्यामुळे ग्रामीण भागात आता कोरोनाच्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
गावाकडे येण्याआधी स्वतःची चाचणी करून घेणे गरजेचे
तसेच खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरी बसून काम करण्याचे आदेश मिळाले आहेत. या कर्मचाऱ्यांचेही गावाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून, बहुतांश ग्रामपंचायत हद्दीतील आठवडेबाजारही बंद केले आहेत. विशेष करून पुण्यासारख्या ठिकाणावरून येणाऱ्या विद्यार्थी किंवा इतर कुणीही परदेशी पर्यटक, विद्यार्थी किंवा कोरोना संशयिताच्या संपर्कात आला असल्यास त्या व्यक्तीने गावाकडे येण्याआधी स्वतःची चाचणी करून घेणे गरजेचे आहे, अशी माहिती एका वैद्यकीय तज्ज्ञाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.