पंधरा लाख कोटींच्या घोषणेमुळे कृषी क्षेत्रासाठी नवीन आशा पल्लवित!

indian_farmer_budget 2020.jpg
indian_farmer_budget 2020.jpg
Updated on

नाशिक : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी कर्जपुरवठा 15 लाख कोटींवर नेण्याची घोषणा केली. या घोषणेचा फायदा स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक, देना बॅंक आणि राज्य सहकारी बॅंकेला प्रामुख्याने होणार आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाढीव कर्जपुरवठा होणार आहे. 

ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत 

"नाबार्ड'ची फेरपतपुरवठा योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असून, त्यामुळे विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांना निधी मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होईल. दोन वर्षांपासून पुरेसा कर्जपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना खासगी माध्यमातून पैसा उभा करावा लागला आणि अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले. जिल्हा सहकारी बॅंकांना राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा काहीसा फायदा झालेला असला तरी बॅंकिंग व्यवहारांना म्हणावी तशी गती आलेली नाही. त्यांच्या खात्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी झालेले आहे. परंतु प्रत्यक्षात वाढीव कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे.
त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

पतपुरवठा आणखी शंभर कोटींनी वाढण्याची शक्‍यता

केंद्राच्या पंधरा लाख कोटींपैकी सहकारी बॅंकिंग क्षेत्राला किती निधी मिळेल, हे येत्या दोन महिन्यांत निश्‍चित होईल. या योजनेचा फायदा आगामी खरीप हंगामासाठी होईल. "नाबार्ड'कडून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला कृषीसाठी पतपुरवठा केला जातो. राज्य सहकारी बॅंक नाशिक जिल्हा सहकारी बॅंकेला दर वर्षी चार टक्के व्याजदराने पंधराशे कोटींचा पतपुरवठा करते. त्यात, वाढ होण्याची आशा अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे पल्लवित झाली आहे. कदाचित हा पतपुरवठा आणखी शंभर कोटींनी वाढण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारच्या डिसेंबरमधील कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बॅंकेला हजार कोटींची मदत झाली आहे. 

नवनवीन योजना, प्रशिक्षण कार्यक्रम वाढवण्याची शक्‍यता

बॅंकेच्या खात्यावरील थकीत कर्ज जवळपास हजार कोटींनी घटले आहे. तरीही राज्य सहकारी बॅंकेचे काही कर्ज हे जिल्हा बॅंकेला फेडणे बाकी आहे. परंतु अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक, देना बॅंक आदींना "नाबार्ड'च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी किमान 75 हजार कोटी ते एक लाख कोटी रुपयांचा पतपुरवठा वाढेल. त्यामुळे या बॅंकांच्या माध्यामातूनसुद्धा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वाढवता येईल. 
अर्थमंत्र्यांच्या घोषणेबाबत बोलताना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर म्हणाले, की "नाबार्ड' राज्य सहकारी बॅंकेला पतपुरवठा करते आणि मग, राज्य सहकारी बॅंक जिल्हा बॅंकेला पतपुरवठा करते. "नाबार्ड' जिल्हा बॅंकेला प्रशिक्षण तसेच कर्जपुरवठा वसुलीबाबत मार्गदर्शन करते. आजच्या घोषणेमुळे "नाबार्ड' जिल्हा बॅंकांना कारभार सुधारण्याबाबत नवनवीन योजना, प्रशिक्षण कार्यक्रम वाढवण्याची शक्‍यता आहे. 

नाशवंत कृषिमाल विदेशात तसेच, देशातील बाजारपेठेत जाण्यास मदत होणार
 
कृषी क्षेत्रासाठी आजच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा झाल्या असून, त्यामुळे कृषी क्षेत्राची गती वाढेल. कृषिमालाची वाहतूक वेगाने होण्यासाठी उडानसारख्या योजनेमुळे जिल्हातील नाशवंत कृषिमाल विदेशात तसेच, देशातील बाजारपेठेत जाण्यास मदत होणार आहे. - केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com