नाशिक/खेडभैरव : कोरोनामुळे यंदा भाविकांना कळसुबाई निवासिनी ट्रस्ट व बारी ग्रामपंचायतीकडून कडक बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसह गिर्यारोहकांचा हिरमोड झाला आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई
महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसुबाई शिखरावर दर वर्षी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळते. मुंबई, ठाणे, नाशिक, तसेच स्थानिक भाविक, गिर्यारोहक दर वर्षी नवरात्रोत्सवात हजेरी लावतात. दर वर्षी एक लाखाहून अधिक भाविक नवरात्रोत्सवात शिखरावर येत असतात. मात्र, कोरोनामुळे या वर्षी कळसुबाई निवासिनी ट्रस्ट व बारी ग्रामपंचायतीने बंदचे परिपत्रक काढून परिसरात याबाबत सूचनेचे फलकही लावले आहेत. येथील आदिवासी बांधवांनी मंदिर परिसरात स्वच्छता करून वारली संस्कृतीचे चित्र रेखाटून रंगरंगोटी केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
आजपर्यंत परिसरातील सर्व नागरिक कोरोना महामारीपासून सुरक्षित आहेत. गाव, नागरिक सुरक्षित राहण्यासाठी कोरोनासारख्या रोगाचा परिसरात शिरकाव होऊ नये म्हणून या वर्षी नवरात्री उत्सवात भाविकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
-तुकाराम खाडे, उपाध्यक्ष, कळसुबाई देवस्थान ट्रस्ट
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.