पर्यटकांनो.. अंजनेरी गडावर येण्याचा प्लॅन असेल...तर तिथेच थांबा!

Aanjneri-02.jpg
Aanjneri-02.jpg

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील अंजनेरी गाव पर्यटकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला म्हणजे गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र यंदा  ग्रामस्थांनी भाविकांना प्रतिबंध केला आहे. याचे नेमके कारण काय? वाचा सविस्तर..

पर्यटकानो अंजनेरी गडावर येऊ नका 

नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गड,किल्ले धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर गदी होते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे धबधबे, गड किल्ले जलाशयावर यायला प्रतिबंध केला आहे. इतर जिल्ह्यातील नागरिकांनी धबधबे गड किल्ले यावर गर्दी टाळावी असे आवाहान करीत, गावोगाव बैठका घेतल्या त्यामुळे जागरुक झालेल्या ग्रामस्थांनी गावबंदीचे पालन सुरु केले आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील अंजनेरी गाव पर्यटकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला म्हणजे गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनी भाविकांना प्रतिबंध केला आहे.

अंजनेरी ग्रामपंचायतीचे आवाहन  

अंजनेरी गडावर भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांना रोखण्यासाठी अंजनेरी फाट्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. भाविक आणि पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये. तशा सूचनादेखील लावल्या आहेत व त्या ठिकाणी कोणीही गडावर जाऊ नये, असे आवाहन अंजनेरी ग्रामपंचायतीने केले आहे. 

30 जूनपर्यंत बंद
जिल्हाधिकाऱ्यांचे हनुमान जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनेरी गडावर भाविकांची गर्दी होऊ न देण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी धार्मिक स्थळे, गडकिल्ले 30 जूनपर्यंत बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अंजनेरी गडावर कोणीही येऊ नये. - अंजनेरीचे ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com