संतापजनक प्रकार.. चिमुकल्यानंतर आता 'त्या' तरूण शेतकऱ्याचाही जीव वाचला असता..नागरिक संतप्त

death.jpg
death.jpg

नाशिक / पळसन : सुरगाणा सारख्या दुर्गम तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा  बळी गेला आहे. त्यामुळे तालुक्‍यात संताप व्यक्त होत आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे पालकांनी संतप्त होत आपला राग आरोग्य व्यवस्थेवर व्यक्त केला होता.

काय घडले नेमके?
खडकीपाडा (काठीपाडा) ता. सुरगाणा येथील रहिवासी असलेले झिमन जयराम गायकवाड शनिवारी (ता.4) सकाळी साडेदहाच्या दरम्यान शेतात काम करत असताना त्यांना सर्प दंश झाला. उपचारासाठी त्यांना उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु उंबरठाणमध्ये कोणत्याही प्रकारचा इलाज न करता त्यांना सुरगाणा येथे पाठविण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्यांचे रस्त्यातच निधन झाले. यामुळे गायकवाड यांच्या गरीब कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

 
उपचारच झाले नसल्याचा आरोप 
गायकवाड यांच्यावर उंबरठाण येथे उपचारच झाले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या शेतकऱ्यावर वेळेवर उपचार झाले असते तर झिमन गायकवाड यांचा जीव वाचला असता असेही नातेवाईकांनी सांगितले. आदिवासी भागात आरोग्य सेवेआभावी कालच (ता.3) गौरव गायकवाड, (रा. मनखेड) या चिमुल्याला आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे पालकांनी संतप्त होत आपला राग आरोग्य व्यवस्थेवर व्यक्त केला होता. मात्र तरीही येथील आरोग्य यंत्रणेने कोणतीही दखल न घेतल्याने आज पुन्हा एका तरूण शेतकऱ्याचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 


आरोग्य केंद्र नावालाच 
आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नावालाच उभे आहेत. तेथे आरोग्य सुविधांची कायमच वानवा असल्यामुळे अजून किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्‍न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. आदिवासी भागात किमान प्राथमिक सुविधा मिळायला हव्यात अशी अपेक्षा या भागातील लोकांची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या या असुविधेला जबाबदार कोण? असा सवाल सामान्य नागरीकांमधून विचारला जात आहे. 

दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा बळी

नाशिक जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात एकीकडे कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तर जिल्ह्याच्या अनेक भागांत बिबट्यांच्या हल्ल्यात जखमींसह मृत्यू होण्याचीही संख्या वाढलेली दिसते. अशात पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची शेतीकामांसाठी धावपळ सुरू असताना शेतातच काम करताना "या' प्राण्याचा दंश जीवघेणा ठरत आहे. सुरगाणा सारख्या दुर्गम तालुक्‍यात तर या दंशामुळे सलग दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी गेला आहे. त्यामुळे तालुक्‍यात संताप व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com