लॉकडाऊनमुळे 'त्याने' व्यवसाय बदलला पण संघर्ष करणे सोडले नाही

shakil
shakil

नाशिक : (निफाड) लॉकडाउनमुळे तीन महिन्यापासून अनेकांचे रोजगार गेले, तर कुणाचा व्यवसाय बंद पडला. वाहनांची चाक फिरली नाही म्हणून यातील अनेक काळी-पिवळी चालक रडत न बसता कुटुंबकबिला चालवण्यासाठी सरकारच्या मदतीची वाट न पाहता कुणी भाजी विक्रेता, कुणी फळविक्रेता, तर कुणी द्राक्षबाग कामगारांची टोळी बनवून आपला उदरनिर्वाह करत आहे. 

तर कुणी बनले द्राक्षबाग कामगार 

निफाड परिसरातील दोनशेहून अधिक प्रवासी वाहतूक करणारे चालक आहेत. निफाड-नाशिक-येवला-पिंपळगाव-उगाव-लासलगाव पट्ट्यात प्रवासी वाहतूक करायची अन्‌ त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा शिरस्ता ठरलेला आहे. मार्चमध्ये लॉकडाउनमुळे त्यांच्या वाहनांची चाके थांबली आणि आर्थिक उत्पन्नही. यात अनेकांनी कर्ज काढून वाहन घेतले होते. आता वाहनांचे कर्ज फेडण्याबरोबरच अशा परिस्थितीत घराचा गाडा चालविण्या करिता या चालकांनी हातावर हात ठेवून न बसता नवीन व्यवसाय सुरू करत आपला उदरनिर्वाह सुरू केला. यात विशेष म्हणजे ज्या महामार्गवर वाहन चालवून ते आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, त्याच महामार्गावर अनेकांनी पालेभाज्या आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यात उगाव आणि नैताळे परिसरातील काळी- पिवळी चालकांनी एकत्र येत द्राक्ष कामगारांची टोळी बनवत द्राक्षबागांची कामे सुरू केली आहेत. 

लॉकडाउन झाला आणि आमच्यापुढे समस्यांचे डोंगर उभे राहिले. एप्रिलमध्ये वातावरण निवळण्याची वाट बघितली. पण चाके काही फिरली नाही म्हणून संसाराचा गाडा चालविण्यासाठी केळी अन्‌ शेगा घेऊन रस्त्यावर बसलो. - शकील शेख (काळी पिवळी, चालक, निफाड) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com