सावदा (ता. रावेर)- येथील भाजीपाला मंडी आवारातील रस्त्यात येणाऱ्या टपरीचे अतिक्रमण पालिकेने हटविल्याने संतप्त व्यावसायिकांनी पालिका कार्यालयावर धडक दिली आणि पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना जाब विचारला. दरम्यान, ही कारवाई नियमानुसार असल्याचे सांगत मुख्याधिकारी वर्मा यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.