Nandurbar Agriculture News: हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचे आवाहन

fruits
fruitsesakal

Nandurbar Agriculture News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२३-२०२४) नंदुरबार जिल्ह्यात केळी, आंबा व पपई या फळपिकांना लागू असून, या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे. (Appeal of District Superintendent Agriculture Officer to take advantage of weather based crop insurance scheme nandurbar news )

नैसर्गिक आपत्ती व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना आहे. ही योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ज्या महसूल मंडळात संबंधित फळपिकाखालील क्षेत्र २० हेक्टरपेक्षा जास्त आहे अशा अधिसूचित मंडळामध्ये ही योजना राबविण्यात येते. यात सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान व गारपीट यांसारख्या हवामानामुळे होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण दिले जाणार आहे.

हवामान धोक्याचे ट्रिगर कार्यान्वित झालेल्या महसूल मंडळातील या फळपीक विम्यात सहभागी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईचा दर महावेध प्रकल्पाच्या माध्यमातून महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येतो.

fruits
Nandurbar Agriculture News : सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव; कापूस पिकालाही फटका

यात गारपीट, वेगवान वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसानभरपाई अंतिम केली जाईल.

नंदुरबार जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा ग्राहक सेवा क्रमांक १८००१०२४०८८ असा आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी व पपई फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर २०२३, तर आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज विमा हप्ता ग्राहक केंद्रामार्फत ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी व्हावे, असेही श्री. वाणी यांनी कळविले आहे.

योजनेतील फळपिके, संरक्षण व पीकविमा दर

केळी व आंबा फळपिकासाठी रुपये एक लाख ४० हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना सात हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. पपईसाठी रुपये ३५ हजार विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना एक हजार ७५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

fruits
Nandurbar Agriculture News : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com