Dhule Water Crisis : पाण्याचा टिपूस नसल्याने वानरे व्याकूळ! पाणवठे तयार करण्याचा वनविभागाला विसर ?

Dhule News : उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाणवठा तयार करण्याचा विसर वनविभागाला पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
A herd of monkeys quenching their thirst on water drawn from a cowherd in a forest area.
A herd of monkeys quenching their thirst on water drawn from a cowherd in a forest area.esakal

म्हसदी : वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी ' व्याकूळ' झाले आहेत. राहूड - काळगाव (ता.साक्री) येथील कुरमाळ वनक्षेत्रात वानरांच्या कळपाने गुराखी जवळील पाण्याचे ढबडे हिसकावत पाण्याची तृष्णा भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुराख्याने प्रसंगावधान राखत राहूड शिवारातील शेवडीतील पाणी काढून मुक्या प्राण्यांची तहान भागविली. यामुळे उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाणवठा तयार करण्याचा विसर वनविभागाला पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. (Dhule Water Crisis Monkeys worried because no water supply )

पाण्याच्या कमतरतेमुळे जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. मंगळवारी (ता.२३) काळगाव येथील गुराखी काशिनाथ लाला अहिरे कुरमाळ वनक्षेत्रात आपली गुरे चरायला घेऊन गेले होते. वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा टिपूस नसल्याने श्री. अहिरे यांच्या गळ्यात पाण्याचे ढबडे पाहून माकडांचा कळप पाण्यासाठी त्यांच्या जवळ पिण्याचे डबडे हिसकावत पाण्याची तृष्णा भागविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. त्यानंतर श्री. अहिरे यांनी राहूड वनक्षेत्रातील शेवडीतून पाणी काढून माकडांची तहान भागविण्याचा प्रयत्नही केला.  (latest marathi news)

A herd of monkeys quenching their thirst on water drawn from a cowherd in a forest area.
Nashik Water Crisis: पाणीपुरवठ्यासाठी दिवसाला दीड लाखाचा चुराडा! येवल्यात 77 वाड्या-वस्त्यांसाठी 45 टँकर अहोरात्र कार्यरत

वनविभागास पाणवठ्याचा विसर?

जंगलात वानरांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी सैरभैर झाली असूनही वनविभागाला याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. वन्यजीवांचे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होवू नये म्हणून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार केले जात असतात. अशी व्यवस्था या परिसरात करण्याची मागणी देखील नागरिक करत आहे. मात्र याबाबत वन

"यंदा अत्यल्प पावसामुळे वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा थेंब नाही. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा जीवही जाऊ शकतो. पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिन्यापेक्षा अधिक काळ जाणार आहे. तो पर्यंत पाण्याची निकड लक्षात घेऊन वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी."

- विजय भामरे, काळगाव.

A herd of monkeys quenching their thirst on water drawn from a cowherd in a forest area.
Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यातील 5 लाख लोकांच्या घशास कोरड! 768 गाव-वाड्यांना 256 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com