VIDEO : अख्ख आयुष्य गेलं...शासनाची एक दमडीही मानधन नाही

lokkalavant.jpg
lokkalavant.jpg

नाशिक : ग्रामीण लोककलेसाठी अख्ख आयुष्य गेलं..मात्र आम्हाला एक दमडीही सरकारने दिली नाही.ऐन म्हातारपणात मानधन देण्याची केवळ वल्गना असून हे मानधन मिळवण्यासाठी अत्यंत अडचणींचा व जाचक कागदपत्रांचा पाठपुरावा करावा लागतो,तो थकल्या वयात कसा करायचा? कोण आम्हाला पुरावे व दाखले देणार? अशी खंत लोककलावंतांनी 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केली आहे.

शासनाला लोककला नको, केवळ कागदं हवी

शासनाला लोककला नको, केवळ कागदं हवी, यामुळे अश्या योजनांत कित्येक खोटेनाटे योजनेचा लाभ घेतात,आम्ही ग्रामीण आदिवासी भागातील मूळ लोककलांचा वारसा चालवणारे आम्ही व आमच्यासारखे हजारो ग्रामीण कलाकार नाशिक जिल्ह्यात वयोवृद्ध कलावंत मानधन योजनेपासून वंचित आहोत.त्यामुळं म्हातारपणात आमच्यावर उपासमारीची व सामाजिक अप्रतिष्टेची वेळ आलीय,लोककलेचा वारसा आयुष्यभर पेलूनही आम्हाला कुठं ही मान सन्मान मिळत नाही.दारिद्र्य नशिबी असल्याने कुठं कदर होत नाही.

मार्गदर्शन सहकार्य मिळत नाही.

साध्यासुटबुटात,भरजरी फेटा घातलेल्यांचा जमाना असल्याने आम्हाला विचारतो कोण?आमच्यासाठी असलेली सरकारी मानधन योजनही आमच्यासाठी मोठी अडचण आहे.या योजनेत पंचायत समिती व नाशिकच्या जिल्हापरिषदेच्या समाजकल्याण विभागाचेही याबाबतीत मार्गदर्शन सहकार्य मिळत नाही.अशी स्थिती आमच्या सारख्या कित्येक जुन्या ज्येष्ठ लोककलावंतांच्या नशिबी आहे.अशी कैफियतच जेष्ठ कलावंत पांडुरंग बॅंडकोळी (रा धोंडेगाव गाव ता.जिल्हा नाशिक)यांनी दैनिक सकाळच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.

अजूनही मूळ लोकलावंतांची कदर नाही",

कलगी-तुरा,तमाशा,कनात,बोहाडे कलाकार,महिला वेशभूषेतील पुरुष नर्तक,परशराम पुरी कलावंत,वाघ्या मुरळीबहुरूपी,पोतराज,वासुदेव,कंदिलबाबा,पिंगुळ कलाकार,अश्या अनेक लोककला व लोककलावंत ग्रामीण भागातून दिवसागणिक नष्ट होत आहे.या लोककला टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभागाची जबाबदारी आहे,त्यांना याबाबत सर्व शासकीय सेवा उपलब्ध आहेत. मात्र केवळ कागदी घोडे नाचवणारया विभागाकडून अजूनही मूळ मातीतील लोककला व लोककलावंतांची उपेक्षा व दुर्लक्ष आहे.केवळ सरकारी उत्सव घेऊन सरकारी अनुदाने लागणाऱ्या विभागाकडून अजूनही मूळ लोकलावंतांची कदर नाही",

आमची कला मोबाईलच्या जगात सामाजिक दृष्ट्या आता भिकेला लागल्याचे"कोचरगाव कनात मंडळाचे प्रमुख विजू टोंगारे यांनी सांगितले,ते पुढे म्हणाले की कर्ज काढून फड सुरू केलाय,केवळ जत्रा,यात्रेत आमच्या कलेला मागणी असते,बाकी सण उत्सवाला आम्ही आमची कला सादर करतो,मात्र सध्या लोककलेतून पोट भरत नाही,नवीन मंडळी त्यात इंटरेस्ट घेत नसल्याने ही लोककला सर्वत्र कालबाह्य होत आहे,यापुढं केवळ कागदावर लोककला बघायला मिळतील अशी गत आहे.अशी अपेक्षा असल्याने आमच्या भविष्यात आम्हाला भीक मागून जगावं लागेल,कारण सरकारी मानधन आमच्यापर्यंत येतच नाही,त्याची कागदपत्रे जाचक असल्याने आम्ही निराधार आहोत.

प्रतिक्रिया
बेजबाबदार प्रशासनामुळे आज लोकलावंत उपेक्षित राहतात.अश्या योजना कलावंतांना पोहोचवल्या जात नाही केवळ ऑफिसात बसून कागदी कारभार सुरू आहे,कित्येक कलाकार वंचितच आहे.तसेच सामाजिक राजकीयदृष्ट्या कलांकार व लोककलांची कदरच करणारे उरले नसल्याने केवळ वरवर लोककलेचा उत्सव शासनाचा सांस्कृतिक विभाग,लोककला अकादमी वाले करतात,अजूनही ही मंडळी मूळ ग्रामीण लोकलावंतांना भेटली सुधा नाही अशी गत वास्तव आहे - आनंद पगारे (निर्माता,दिग्दर्शक फिल्म मेकर):

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com