Mayur Koli
sakal
मेहुणबारे (ता. चाळीसगाव): एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केले जात असेल, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १०० नुसार प्रांताधिकाऱ्यांना ‘शोध वॉरंट’ जारी करण्याचे अधिकार असतात. याच अधिकाराचा वापर करून येथील प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्यामुळे चाळीसगाव तालुक्यातून अपहरण करून नेलेल्या १६ वर्षीय मुलाची सुटका झाली आहे. या सुधारित कायद्याचा राज्यात पहिल्यांदाच वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.