banana insurance scam
sakal
जळगाव: जिल्ह्यास विश्वात ओळख निर्माण करून देणाऱ्या केळी पिकाच्या विम्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार घडवून आणल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात कुठल्याही केळी पिकाची लागवड न करता फक्त कागदोपत्री पीक लावल्याचे नोंदवून सरकारची ७५ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला असून, केळी पट्टा असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर पाठोपाठ जळगाव तालुक्यातही १० कोटीची फसवणूक झाल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.