Jalgaon municipal corporation
sakal
जळगाव: भाजपने नागरिकांसाठी २०१८ च्या निवडणुकीत जाहीर केलेल्या वचननाम्यात शहरातील ३०० चौरस फुटांच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचे आश्वासन दिले होते. गरीब वस्तीतील नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय बदलत्या राजकीय समीकरणामुळे मागे पडला. मात्र आता महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता असल्याने यंदा तरी हे आश्वासन पाळले जाईल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.