Weather Change
sakal
जळगाव: जिल्ह्यात हिवाळा संपताच उष्णतेचा पारा चढू लागला आहे. ऋतू बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. मागील काही दिवसांत कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्याचबरोबर सकाळी व रात्री तापमानात गारवा राहिल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील फरक वाढला. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, त्वचेच्या व पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी वाढल्या.