जिल्ह्यात 37 गावांना पाणीटंचाई! 

जिल्ह्यात 37 गावांना पाणीटंचाई! 

जळगाव ः जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. नोव्हेंबरमध्येच जिल्ह्यातील 1152 पैकी 37 गावांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांना वीस टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 
जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळामुळे पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल 36 कोटी 24 लाखांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्याअंतर्गत संभाव्य टंचाईग्रस्त गावांना कूपनलिका तयार करणे, विहिरींचा गाळ काढणे, विहिरी अधिग्रहीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे पत्र देऊन टंचाईसाठी संभाव्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अपेक्षित आहे. टंचाईग्रस्त गावांकडून पत्र आल्याशिवाय टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार नाहीत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांनी पाणीपुरवठ्याबाबतचा कल लक्षात घेऊन आगामी काळातील टंचाईचा अंदाज घेऊन उपाययोजना करण्यासाठी पंचायत समित्यांना पत्र देणे अपेक्षित आहे. मात्र, तशी पावले ग्रामपंचायतीने उचलली नाहीत. यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करणाऱ्या यंत्रणेला कामे कोणत्या गावात सुरू करावीत, असा प्रश्‍न आहे. 

धरणातून आवर्तन सोडल्याने काही गावांना दिलासा 
वाघूर व गिरणा या धरणांतून आवर्तन सोडल्याने या नद्यांकाठच्या अनेक गावांना टंचाईपासून दिलासा मिळाला आहे. "गिरणा'पट्ट्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा; तर जामनेर तालुक्‍यातील गारखेडा, कंडारी, नशिराबाद, सुनसगाव, बेळी, खेडी, भादली, असोदा आदी गावांना पाणीटंचाईपासून काहीअंशी दिलासा मिळाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com