पुनवर्सनासाठी हे करताय अजूनही लढा 

varkhede dam
varkhede dam

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः वरखेडे (ता.चाळीसगाव) बॅंरेज प्रकल्पाचे काम ज्या प्रमाणात झाले आहे; त्या प्रमाणात पुनर्वसनाचे काम झालेले नाही. त्यामुळे पुनर्वसन होईपर्यंत धरणाचे काम बंद ठेवावे अशी मागणी वरखेडे-लोंढे प्रकल्पग्रस्त कृती समिती, तामसवाडी यांनी केली आहे. येत्या आठ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर धरणाचे काम बंद पाडले जाईल्‌ असा इशारा यावेळी देण्यात आला. 
वरखेडे प्रकल्पावर कृती समितीच्यावतीने आज येथे इशारा मोर्चा काढण्यात आला. याबाबत वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की येत्या आठ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लागला नाही; तर धरणाचे काम बंद पाडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या अश्‍याचे निवेदन पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांना देण्यात आले. 

आधी पुनर्वसन मग धरण 
याबाबत कृती समितीचे म्हणणे आहे की, दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत तामसवाडी गावाला शंभर टक्के पुनर्वसन देऊ या मागणीला मान्यता दिली. परंतु वरखेडे धरण हे येत्या मार्चमध्ये पुर्ण होणार आहे. निविदा निघेल त्याची नोटिफिकेशन होईल नोटिफिकेशन निघाल्यावर ती दोष पोट पुनर्वसनासाठी योग्य आहे शेतकऱ्याकडून घ्यावे लागेल तर देणाऱ्या आम्हाला कमीत कमी त्या शेतकऱ्यांना 45 दिवस हरकत देण्यासाठी देतील तोपर्यत धरणाचे काम होवून जाईल. आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा आहे. मात्र गावकऱ्यांना अंधारात ठेवून आतापर्यंत धरणाचं काम केले जात असल्याचा आरोप कृती समितीने केला असून याचा निषेध म्हणून शांतता मोर्चा काढला. येत्या आठ दिवसात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आजपर्यंत जे आंदोलने शांततेत केली यापुढे उग्र स्वरूप होईल. आमची मागणी जर मान्य करीत नसाल तर काम करू देणार नाही; असा इशारा तामसवाडी ग्रामस्थांनी दिला. पुनर्वसनाचे काम होईपर्यंत धरणाचे काम बंद ठेवावे, जोपर्यंत तामसवाडी गावाचे पुनर्वसन होत नाही; तोपर्यंत बॅरेजमध्ये पाण्याचा एक थेंबही अडवला जाणार नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत 3 जानेवारीला ठरले होते. तो शब्द पाळला नाही. या स्थितीत जे पाणी अडवले गेले, त्यामुळे गावाचा एक शिवार रस्ता बाधित झाला आहे. घरांचे व जमिनींचे मूल्यांकन करावे अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मोर्चाच्यावेळी वरखेड लोंढे कृती समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, उपाध्यक्ष शिवदास पाटील, सचिव प्रशांत पाटील, सचिन पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सदस्य शांताराम पाटील,विठोबा पाटील, रमेश पाटील, कविता पाटील, मनीषा पाटील, सविता पाटील, रमेश पाटील,भास्कर पाटील, माधवराव पाटील,भगवान पाटील, सचिन पाटील, समाधान पाटील व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com