नांदगाव: तालुक्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या सत्तर टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेले पावसाचे पुनरागमन नांदगाव तालुक्यासाठी खूपच दिलासादायक ठरले आहे. क्वचित भरणारे नाग्यासाक्या, माणिकपुंज धरण तुडुंब भरले आहे. त्यापाठोपाठ आता मन्याड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. एकूणच तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस दुष्काळी समजल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे.