मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या काही दिवसापासून भाव नसल्याने टोमॅटोचा (tomatoes) लाल चिखल झाला आहे. आता टोमॅटो पाठोपाठ कारल्याचे (bitter gourd) भाव घसरल्याने सोयगाव येथील शेतकरी दीपक बच्छाव यांनी शेतात पिकविलेले कारले बांधावरील उकिरड्यावर फेकले आहेत. भाजीपाला व फळभाज्यांना भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उत्पादन खर्चही सुटत नसल्याने घर खर्च भागवून कर्जाचे हप्ते कसे फेडावेत ही विवंचना शेतकऱ्यांना (farmers) आहे.
कर्जाचे हप्ते कसे फेडावेत; शेतकऱ्यांना विवंचना
कसमादे परिसरातील भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. काष्टी फाट्यावरील शेतीत दीपक बच्छाव यांनी तीन एकरात कारल्याची लागवड केली. त्यासाठी मित्रमंडळी, नातेवाइकांकडून तीन ते साडेतीन लाख रुपये भांडवल जमवले. कारले पीक आल्यानंतर चांगला भाव व उत्पन्न मिळेल. कर्ज फेडून चार पैसे हातात येतील अशी आशा दीपक बाळगून होता. एरव्ही १५ ते २० रुपये किलो भाव असलेल्या कारल्याला बाजार समितीत अवघा चार रुपये किलो भाव आहे. भाव कमी असल्याने कारले तोडून बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठीचा खर्चदेखील सुटत नाही. त्यामुळे दीपकवर कारले फेकून देण्याची वेळ आली.
तीन लाखांचा केला खर्च
कारले पिकासाठी तीन लाख रुपये खर्च केला. शंभर टक्के खर्च पूर्ण वाया गेला आहे. यातच जिल्हा बँकेचे कर्ज थकीत आहेत. बँकेचा कर्जवसुलीसाठी तगादा सुरू असल्याने दिपकसह थकबाकीदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.