नाशिक- आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे माझ्या कधी ऐकण्यात आले नसल्याचे सांगत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी घूमजाव केले. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतला असल्याने तेच बोलू शकतील, अशी पुस्ती जोडत या विषयावर त्यांनी अधिक बोलण्यास नकार देत कर्जमाफीच्या विषयातून अंग काढून घेतले.