नाशिक- राज्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सुधारित आणि कठोर कायद्याची गरज आहे, अशी ठाम मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे. तसेच, चुकीचे बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच नुकसानभरपाई वसूल करावी, अशी सूचनाही या निवेदनात करण्यात आली आहे.