येवला- ‘ब्रिटिशकाळापासून दुष्काळी’ असं बिरुद माथी लागलेल्या येवल्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी यंदा युरोपात चार हजार टन द्राक्षांची निर्यात केली. यंदा थोडी घट असली तरी त्यातून तब्बल २७ कोटींचे परकी चलन मिळाले. पाटोदा, मुखेड भागांतील तब्बल ४०० शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे. शेततळे आणि पाटाच्या पाण्यामुळे ही किमया साधली आहे.