Devendra Fadnavis
sakal
नाशिक: नाशिक महापालिकेत नाशिककरांनी प्रेमरुपी दिलेल्या विश्वासाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांमध्ये नाशिकचा चेहरामोहरा बदलताना शाश्वत विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकचा रिंगरोड हा विकासाचे ग्रोथ सेंटर ठरणार असून विमानतळाच्या विस्तारामुळे नाशिकच्या विकासाला भरारी प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल, असा शब्दही त्यांनी दिला.