पंचवटी: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार असून, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या स्वतंत्र बाजार समिती केली जाणार आहेत. त्यासाठी शासनाने स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे. महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाने याबाबत आदेश निर्गमित केली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. मुद्देनिहाय चौकशी करून पुराव्यापृष्ठर्थ्य कागदपत्र व अभिप्रायासह एका आठवड्यात वस्तुस्थतीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.