

Natural Calamity: Unseasonal Rain and Hailstorm Devastate Baglan Taluka
Sakal
सटाणा : बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे दुहेरी संकट कोसळताच शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शासनाला धारेवर धरले आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा, मका, गहू, हरभरा, डाळींब, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून राज्य शासनाच्या धोरणामुळे “आई जेऊ घालेना आणि बाप भिक मागू देईना” अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.