खरीप पेरणीपूर्वी नांगरणीला सुरवात; शेतजमीन भुसभुशीत करण्यावर भर

नांगरणी
नांगरणी esakal

विराणे (जि. नाशिक) : माळमाथा परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरवातीला बहुतांशी ठिकाणी कांदा काढणी केली जाते. बहुतांश विहीरीतील तळ गाठतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला कामच राहत नाही. वेळेचा वापर येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतजमीन नांगरून ठेवणे व ती भुसभुशीत करण्यावर शेतकरी भर देत असतात.

जमिनीची लवकर मशागत केल्याने हवा खेळती राहते. शिवाय भरघोस उनदेखील जमिनीला मिळते. त्यामुळे रब्बी व उन्हाळी कांदा काढणीनंतर माळमाथा परिसरात खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. एप्रिलपासून येथील शेतकरी मशागतीला वेग आणतात. कारण, मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक चढतो. यात काम करणे जिकरीचे जाते. शिवाय बैलजोडीची देखील मोठ्या प्रमाणात दमछाक होते. नांगरून उन्हात तळपलेल्या शेतात खरीप हंगामात तणदेखील कमी होते. परिणामी, निंदणी खर्च कमी होतो. नांगरणीनंतर खत पसरविण्यासाठी भरपूर वेळ मिळत असतो. ट्रॅक्टरपेक्षा बैलांनी केलेली नांगरणी अधिक भुसभुसीत असते. म्हणून बहुतांश शेतकरी बैलांच्या नांगरणीला पसंती देतात. इतर कामे थांबल्याने शेतकऱ्यांना भरपूर वेळ असतो.

नांगरणी
स्वतंत्र पीक विमा योजना राबविणार

"बैलजोडीची नांगरणी ट्रॅक्टरपेक्षा स्वस्त असते. शिवाय नांगरणी खोलवर जात असल्याने खरीप पिकांत तण कमी होते. त्याचा फायदा पिकांना होतो."

-अरविंद देवरे, शेतकरी, चिंचवे

नांगरणी
शेतकऱ्यांमागे शुक्लकाष्ठ; पाणीटंचाईमुळे कांद्याची वाढ खुंटली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com