Nashik Birhad Andolan : १५० दिवसांच्या संघर्षानंतर अखेर 'बिऱ्हाड' हटले! नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नाका ते गडकरी चौक मार्गावरील वाहतूक मोकळी; पोलिसांचा सुटकेचा निःश्वास

Nashik's 'Birhad Andolan' Ends After Five Months : नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयासमोर तब्बल १५० दिवसांपासून बंद असलेल्या त्र्यंबकेश्वर नाका ते गडकरी चौक मार्गावरील आंदोलकांचे साहित्य (पाल, बॅरिकेड्स) हटवून, पोलिसांनी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी पहिली बस मार्गस्थ केली आणि वाहतूक सुरळीत केली
Nashik Police

Nashik Police

sakal

Updated on

नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत (बाह्यस्रोत) कंत्राटी भरती विरोधात तब्बल पाच महिन्यांपासून सुरू असलेले ‘बिऱ्हाड आंदोलन’ अखेर रविवारी (ता. ७) संपले. आंदोलकांनी ‘बिऱ्हाड’ मागे घेत असल्याचे पत्र पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिल्यावर रस्त्यावरील पाल, बॅरिकेड्‌स काढून वाहतुकीला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांसह पोलिसांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. तब्बल १५० दिवसांनंतर रस्ता मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com