भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!

भाजप यंदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरेल
भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!
भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!sakal

नाशिक : या मोर्चानंतर शिवसेनेच्या गोटात थोडी का होईना अस्वस्थता पसरली. या अस्वस्थतेचं कारण स्पष्ट आहे. भाजप यंदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरेल, हे स्पष्ट झालं. दुसरीकडे शिवसेनेच्या डोक्यात काहीअंशी का होईना गेलेली हवा आता हळूहळू कमी होईल. कुठल्याही स्थितीत महापालिकेवर आपला झेंडा फडकेल, असं जणू त्यांनी गृहीत धरलंय. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांच्यातील सीमारेषा भाजपच्या मोर्चाने गडद केली. भाजप पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी जंग जंग पछाडणार, हे स्पष्ट आहे. भाजप हा तसा कायम ‘इलेक्शन मोड’मध्ये असलेला पक्ष. मधल्या काळात शिवसेनेत काही जुने दिग्गज नेते दाखल झाले. त्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढली. पण ही सगळी मंडळी किती एकसंध आहेत, हे अजून समोर आलेलं नाही. भाजपमध्येही सुंदोपसुंदी आहेच. गट-तटांचं राजकारण तिथेही रंगत. पण आक्रोश मोर्चाचं निमित्त साधून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमची ताकद अभेद्य आहे, हा स्पष्ट संदेश देण्यात भाजप नेत्यांना यश आलेलं आहे.

भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!
धुक्यात कांदा पिके जगविण्यासाठी शेतकरी करताहेत जीवाचे रान

निवडणुकीत काय मुद्दे असतील हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. कायदा-सुव्यवस्था कळीचा मुद्दा असेल, हे भाजपने या मोर्चाद्वारे अधोरेखित केलं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लागणारे विकासाचे मुद्दे लोकांसमोर अधिक सुसंगत रीतीने मांडण्याचा प्रयत्न असेल. अलीकडेच घोषणा झालेला आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क ही त्याची ठसठशीत उदाहरण. भाजपचा निश्चित असा एक मतदार वर्ग आहे. मध्यमवर्गीय लोकांमध्ये स्वतःची प्रतिमा ठसवण्यात भाजपला यापूर्वीच यश आलेलं आहे. शिवसेना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. भाजपला सत्ता देऊन झालं, आता आम्हाला पूर्ण सत्ता द्या, हा शिवसेनेचा मुद्दा असेल. जे प्रकल्प भाजपच्या अजेंड्यावर असतील, त्यातील ते मुद्दे खोडून काढत शिवसेनेला मैदानात यावं लागेल. अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी भाजपची उडणारी तारांबळ जनतेच्या लक्षात येते. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेचा सुमारे दोन वर्षांचा कालावधी भाजपकडे होता. पालकमंत्रिपद भाजपने उपभोगलं त्या काळात काय झालं, याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल. भाजपला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेना कशी साधणार, यावरही बरंच काही अवलंबून असेल.

भाजपचे शक्तिप्रदर्शन, शिवसेना अस्वस्थ!
धुक्यात कांदा पिके जगविण्यासाठी शेतकरी करताहेत जीवाचे रान

भाजप आणि मनसेच्या मैत्रीच्या सुवार्ता अनेक दिवसांपासून ऐकायला येत आहेत. पण त्यातील निश्चित बातमी हाती यायला अजून थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. भाजप-मनसे युती झाल्यास भाजपचं नुकसान अधिक तर मनसेला जीवदान, अशी स्थिती राहण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत अजून प्राथमिक चर्चाही सुरू झालेली दिसून येत नाही. गुप्त बैठकांच्या गुप्त बातम्याही अजून ठोसपणे समोर आलेल्या नाहीत. राज्यातील तीन पक्ष नाशिक महापालिकेत काय करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजप-मनसे असो किंवा महाविकास आघाडी, या सगळ्यात कळीचा मुद्दा जागा वाटपाचा असेल. दोन्ही ठिकाणी समझोता साधण्यात किती यश येतं, यावर निवडणुकीतील प्रमुख समीकरण अवलंबून असतील. राजकारण राजकारणाच्या जागी ठेवून जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर आणि नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने भूमिका मांडून जनतेचं लक्ष वेधून

घेण्याचं महत्कार्य सर्वपक्षीय नेतेमंडळींना करावं लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी आणि शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दिवस आणि रात्र दोन्ही वैऱ्याची आहे, असंच म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com